बुधवार, ५ मार्च, २०२५

मृत्यूही ओशाळला होता…! | संतोष देशमुख हत्या आणि समाजाचा संवेदनाहीन चेहरा"


कालचा दिवस इतक्या दुर्दैवी होता की,मी ते संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहू शकलो.आता ही माझ्या डोळयासमोरून ते दृश्य हालत नाही.डोळयातील आसवांना खंड नाही.मेंदूत चीड,संताप आणि हाताशपण्याच्या लाटा उसळत आहेत. 

मीच माझ्याचं चेह-यावर का थुंकत नाही? समग्र माणूस जातीवर ती गिधाडे हासत होती.

पुराणातही राक्षस असाचं मृत्यू  एन्जॉय  करतं.  असं अनेकदा ऐकलं होतं. वास्तवात कुणी इतकं क्रूर असू शकत? ह्या राक्षसाचे चेहरे डोळयासमोर नंगानाच करत होते.

 माझी,आज ही नजर त्या रक्ताच्या थारोळ्यात अडकलीय... संतोष देशमुख यांचा निर्घृण खून... त्यांचा पडलेला निपचित देह....!!

...आणि त्याभोवती उभे असलेले ते भावशून्य चेहरे..!! समग्र,माणूस जातीच्या चेह-यावर थुंकणारे ते नराधम.

  तो चेहरा कुणा माणसाचा नाही.ते मुत्तेमवार होते इथल्या समाजव्यवस्थेवर,पोलिस यंत्रणेवर.ते निपचित पडलेले प्रेत आहे इथल्या माणुसकीचे. 

कुणीतरी फोन काढून फोटो घेत होतं,कुणीतरी "व्हायरल करू" म्हणत होतं, कुणीतरी त्यांच्या जखमांची मोजदाद करत होतं...आणि कुणीतरी निव्वळ तमाशा पाहत होतं.,ते पण ऑन लाईन.ते हसू क्रूर होतं.ते  कुठल्याही शस्त्रापेक्षा धारदार होत.काळीज चर्र चिरत गेलयं भाऊ.

   हे हात इतके क्रूर का झाले? त्यांची ह्रदय दगडाची का झाली? का आटून गेली माणुसकीची हळवी ओल त्यांच्या ह्रदयातली? मृत्यूचं दान ही का त्या दुर्देवी  जीवाला ते देत नव्हते?

  सत्तेतून  पैसा,पैशातून सत्ता,अंगात माज.सत्ता रखेल झाली. त्या भ्रष्टतेच्या रगीवर,उशीवर हे सैतान पोसत गेली.उन्मतपणा असाच पोसत गेला.

आता सावा सारखं  त्यांची फाशीच मागणी तेच करतील. दगडाच्या काळजाने संवेदना ही व्यक्त करतील.

ही सारी जागी जाणती माणसं थुंकतं का नाहीत त्या नराधमावर? सत्तालोलुप  त्या गिधाडांवर?

मला नक्की आठवतं.माझी तीस वर्षा पुर्वी  ताई वारली होती.तिचा चेहरा....शेवटचा पाहण्यासाठी मला असचं त्या प्रेतापुढे उभं केले होते.मी डोळे झाकून घेतले होते.मला नाही पाहयचा चेहरा तिचा.आयुष्यभर नाही तिचा हा मलूल चेहरा मी माझ्या अंतरंगात साठवू शकत?

का?

मला तिचा कायम चेहरा हसरा चेहरा माझ्या ह्रदयात कोरून ठेवायचा आहे.

त्या वैभवीला ... तिचा वडिलांचा हासरा चेहरा आठवेल का? तिच्या  अंतरंगात  काय काय चिखल्या गेलयं?

उरात हे धगधगत दुःख घेऊन तिनं असच जगायचं का?

      एकेकाळी मृत्यूला शोकांतिका समजलं जायचं. आज मात्र तो केवळ एक "कंटेंट" बनलाय... सोशल मीडियावर शेअर होणारा, मिम्समध्ये रूपांतरित होणारा, आणि काही तासांत विसरला जाणारा... जसा संतोष देशमुख विसरला जाईल. नराधम पुन्हा नंगानाच करतील तुमच्या आमच्या छाताडावर.

     संवेदनशिलतेपेक्षा तुम्ही जर सत्तेच्या खुर्च्या उबीत बसणार असाल तर काय होईल?

या देशात नराधमाच्या आरत्या होत असतील तर दुसरं काय होईल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

होळी तेव्हाची आत्ताची.होळी गावचो शहराची..!!!

शिमगा सण म्हणजे बोंबलायचा सण. शिमग्याला होती म्हणतात,हे लयीत उशीराशकळलं आम्हाला एक मारकुटे मास्तर होत कुलकर्णी  ते फार शुध्द बोलायचं त्यानं ...