रविवार, १६ मार्च, २०२५

श्रावणी बाळ ,'मला माफ कर 'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.


श्रावणी बाळ ,'मला माफ कर
'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.
बीड जिल्ह्यातील  केज तालुक्यातील विनाअनुदानित  शाळेतील शिक्षक  धनजंय नागरगोजे यांनी आपल्या मुली उद्देशून  फेसबुकवर  भाव पोस्ट करत आयुष्य संपवलं.
श्रावणी बाळ,मला माफ कर'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं
दुदैवी-शिक्षक-धनजंय-नागरगोजे
होय,शिक्षक पण आत्महत्या करतात.
काल-बीड-पुन्हा हादरलं.
काल 'पुन्हा बीड हादरलं. एका शिक्षकाने फेसबूक पोस्ट करून आपलं आयुष्ष संपवलं.

मान्य तो खचला.त्यानं त्याच्या खडतर जगण्याच्या या जंग मध्ये 'पराभव पत्करतला. त्याचा इथल्या व्यवस्थेने बळी घेतला.आपत्या डोळ्यातली उरली सुरली स्वप्न कुणी खुडून घेतली. जाळून टाकली की माणूस हताश होतो.खचतो. माणसं मरतात.आत्महत्या करून मरतात? हल्ली आपलं मरणं जाहीर करून लोक मरत आहेत.

 नाही झेपला त्याला हा संघर्ष. तो गेला.भवसागरातील बुडबुडा शांत झाला.
 या आथांग भवसागरातल तो लुप्त झाला. कदाचित त्याच्या आयुष्याचा हा पूर्ण विराम असेल? त्यानं आपण होऊनच आपला जीवनरेषाखंड आखून घेतला. त्याचं हे जाण अनेक प्रश्न उमटून गेले.नुसता माणूस मरत नसतो.
 श्रावणीचा बाप..हिरावला. 
कुण्या सुवासिनीचं कपाळ पांढर झालयं.
कुणाचा पोटचा गोळा गेलाय.
 त्या दुःखाची आपण कल्पना ही करू शकत नाहीत.
 हे झाल आपलं आपल्या शरीरात हदय नावाचा एक अवयव आहे .डोळ्व्यातले आसवं आपण सहज ढाळू शकतो? एवढच करू शकतो ना आपण त्या दुदैवी जीवासाठी?
    या दुःखाच्या जाणिवा संस्था चालकाना नसतात कारण ते लांडग्यांच्या काळजाचे असतात.त्यांना दया मया काही नसते.त्यांच ह्रदय हे दगडाची असतात. पैसा व सत्तेचा एक माज आसतो.तो माज माणसाला असंवेदनशीलशील बनवतो. प्रत्येक जीवाचं जगण्याची आपली काही सुंदर स्वप्न असतात.
 काही आशाचं मूळं मनात खोल रूजत गेलेली असतात. त्या स्वप्राच्या मागे तो धावत राहतो.जीव स्व्नलोलुप असतो.
     मासे कसे पकडतात?गळाला आमिष चिकटवलेले असतं.गळ पाण्यात फिरत राहतो. मासे आमिष पकडण्यासाठी प्राण परात आणि शेपटात आणून तडफडत असतात.गळ नरडीचा लागतो. तडफडत राहतात मासे.सा-या हालचाली निर्थक असतात 
      तशी ही माणसं कायम विनाअनुदानित शाळेत अडकली जातात.जगणंचं मरण होऊन जातं त्यांच. कायम विनाअनुदानित शाळेतील हे शिक्षक शिक्षिका त्या तडफणा-या माश्या सारखी असतात. अर्थिकदृष्टया माणूस कुमकवत होत गेला की तो खचत जातो.आपल्या आशा आकांक्षाला मुरड देत राहतो.तो तडजोडी करतो.त्याला तडजोडीची सवय जडते. त्याला कुणाशी पंगा घ्यायचा नसतो.पाय बांधलेले डुक्कर कुणाशी थोडचं पंगा घेऊ शकत? ते फक्त तडफडू शकतं.बेकू नाही म्हणून तोंडात बोळा कोंबण्याची ही सोय असतेचं की कुणी तरी सांगितलेले.वाचलेले आठवते 
 अंधारा नंतर प्रकाश असतो.प्रत्येक रात्री नंतर हासरी सकाळ असते.असं थोडचं असतं आयुष्यातल्या सा-याचं वाटा फुलांनी सजवलेल्या.हे ही दिवस जातील या आशेवर तो दिवस ढकलत राहतो.
      तो ढकलत नाही.तो त्या चाकोरीत फिरत राहतो. कुणी तरी मातीत बीज होऊन गाड्रून घेतल्याशिवाय झाडं डवरतं नाही.फुलांनी फळांनी सजत नाही. आपल्या आयुष्याची तर माती झाली आहे.किमान आपल्या या त्यागातून आपल्या मुलांच्या आयुष्यात तरी पहाट उगवेल अशी अशा असते, 
त्या पुसाटश्या आशेचा अंकुरचं छाटून घेतला गेला तर? तू फाशी घे. एक जाग रिकामी होईल? आम्हाला ती भरता येईल? अस कुणी तरी सांगत आणि हा माणूस स्वतःला मरून घेतो.
  व्यवस्थे विरूध्दचं बंड विनाशाला अंगावर ओढून घेते निर्ढावलेले गिधाडे हे सोडणार नसतात. त्यांना पण काळ सोकावून च्यायचा नसतो.आपला दरारा संपण म्हणजे आपलं साम्राज्य धोक्यात येणं असतं.
      प्र्येकाला आपलं साग्राज्य प्रिय असतं.त्यासाठी वाटेल ते.कायपण. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते.ती पण अतिशय क्रूरपणे.आपली दहशत हीच तर त्या गिंधाडाची ताकद असते. आपल्याला ही हलाल करून मारतील अशी भिती धनंजय नागरगोजे यांना ही वाटलीं.
     मरण ही कोणत्याचं जीवाला हालहाल करून हवं नसतं.भय काल्पनिक असतं.त्याचा एक भोवरा असतो.त्यात जीव गुरफटत राहतो.भिरभिरत राहतो.त्यातूनच ही आत्महत्या झाली जगण्यासाठी नाही मरण्यासाठी त्यांनी दोर जवळ केला.
      आता ज्याची नावं टाकली. त्यांच्यावर गुन्हें दाखल होतील.अटकपूर्व जामीन ही होईल. केस चालू राहिल, कोर्टाच्या अभिलेख्यावर पण..
. पुन्हा कुणी शिक्षक आत्महत्या करणार नाही. याची ग्वाही कुणी देंणार नाही.
हमी तर नाहीच नाही. ज्यांनी एका माणसाच्या रक्तावर रंगपंचमी केली. त्या नराधमासोबत आपले न्यायाधीश रंग उधळत असतील तर ? न्याय कसा असेल? पळवाटा तर आताच आखून घेतत्या असतील ना? आपण या व्यवस्थेचा धिक्कार तरी करणार आहोत का? का उसळेल्या झुंडीत सामिल होणार आहोत?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्रावणी बाळ ,'मला माफ कर 'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.

श्रावणी बाळ ,'मला माफ कर 'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं . बीड जिल्ह्यातील  केज  तालुक्यातील विनाअनुदानित  श...