बरेच माणसं आता मेंदूचा वापर कमी करू लागले आहेत.
ह्रदयचं त्यांच मेंदूचं काम करू लागले आहेतं.
ह्रदयाला काही बुध्दी नसते.तिथं नुसता भावनांचा कल्लोळ असतो.
मेंदूचं कन्फ्यूज झाला आहे.
त्यामुळे बरीचं माणसं विचित्र बोलतात.वागतात.
त्या जुवेकरचचं घे ना?
तो चक्क अक्षय खन्नाला अजून ही बोलत नाही.
का म्हणून काय विचारता ?
अक्षय खन्नाने औरंगजेबाचा रोल केलाय ना? नुसता रोल करेना का?कुणी कुणाचा ही रोल करते पण इतका हुबेहुब रोल करत असतेत का कुठं?
काय डेंजरस रोल वठवला गड्यांनी? तो खरचं औरंगजेब वाटतोय.
तो रोल केल्यामुळे भयंकर राग आलाय त्या जुवेकरला त्या अक्षय खन्नाचा.त्याने (म्हणजे औरंगजेबाने अक्षय खन्नाने नव्हे) इतका शंभू महाराजाना त्रास दिला.त्याला कसं बोलायचं? नुसती चीड येते हो त्याची.संताप पण.
आता चित्रपटात माणसं रोल करतात म्हणजे...?? ते खरे थोडेच असतात?जुवेकरला हे मान्य नाही. खरचं तो नाही बोलला त्या अक्षय खन्नाला.अजून पण नाही बोलत तो त्या खन्नाला.
त्या विकी कौशल सोबतचं तो राहयचा? असचं नाही.विकी कौशल म्हणजे साक्षात शंभू राजेच त्याला वाटत असतील.असं नक्की त्याला फिलींग येतचं असणार.अक्षय खन्ना जर त्याला औरंगजेब वाटत असेल तर विकी कौशल शंभू राजेच वाटत असणार ना? आणि रश्मिका त्याला महाराणी येसूबाई वाटत असणार.
असं एकटं जुवेकरलाचं होतं असं नाही अनेकांना होतं आहे.
नाटकातली सिनेमातली पात्र खरी वाटू लागतात तेव्हा त्या नाटकाचं त्या सिनेमाचं.खर तर ते यश असतं.त्या अभिनयाचं यश असतं. पूर्वी ही खलनायक स्टेजवर आले की माणसं ओरडतं,त्याला शिव्या द्यायचे.
अमरीश पुरी हे कायम खलनायकचं असतं.त्यामुळे त्याला ही लोक खलनायकचं समजतं. वास्तविक जीवनात त फार हवे होते. तेच शक्तिकपूरचं झालं होतं.अनेक मुली महिला त्याला घाबरतं.तो कायमचं बलात्कार करी.शक्तीकपूर चित्रपटात,असला की एक बलात्कार पाहावासा लागे .रम्मा रेडी नावाचा एक साऊथचं खलनायक होता. त्याचा प्रतिबंध चित्रपटातील नाना स्पॉट हा डायलॉग खूप गाजला होता.तो नुसता पडद्यावर दिसला तरी माणसं थरकाप असतं. रस्त्यावर चालताना लोक त्याच्या गाडी पाहिली की बाजूला होतं. त्या गडयाचा दरबाराची तसा होता.
प्रभू रामचंद्र चंद्राची पात्र करणारा त्रिवेदी असो की द्रौपदी साकारणारा रूपा गांगुली असो कि रामायणातील सीता करणारी दीपिका असू लोक यांची पूजा करतात. नितीश भारद्वाज लोक कृष्ण समजून बसले आहेत.
आमच्या गावाची त-हा विचारूच नका.आमच्या शाळेत सैराट चित्रपटावर एक मुलांनी आणि एका मुलींनी डान्स केला. पोरं झक्कास नाचली.
पंचाईत ही झाली की ती पोरं शाळेत आली की मोठी गंमतच होई. सारं जगाचं त्यांच्या मागे लागे.
पोट्टी नुसती ओरडतं. अर्चीन परश्या...अर्चीन परश्या..!! ते रडकुंडीला येतं.हसावं का रडावं हेच कळत नव्हतं.
नाटकाचा आणि सिनेमाचा आपल्या भारतीय समाजावर फार होतो. सहसा युवा वर्ग सिनेमातल्या हिरोला फॉलो करतात.आज ही मालिकेतल्या कपड्याचे दागिन्यांचे डिझाईन्स महिला फॉलो करतात. तात्पुरतं नाटकाच्या सिनेमाच्या विश्वात आपण वावरत असतो.
ते काही तासांत असावं. माणसानं आपल्या वास्तवात यावं ना? तसं घडतं नाही.माणसं त्याचं व्यक्तीरेखात अडकून पडतात. त्यामुळेच केरला फाईल,काश्मीरी फाईल व अलिकडचा दीघे नंबर एक दीघे नंबर दोन असे चित्रपट राजकीय लोक काढतात व आपली वोट बॅक मजबूत करतात.
त्यात त्यांना यश ही येते.
माणसं भावूक होतात.आपली सदसद्विवेक विवेक बुध्दी विसरून जातात.त्यामुळेच सुपारी बाज इतिहासकार आणि अभ्यासक यांच फावते आहे.
मला या सा-याचं टेन्शन्स नाही मला त्या अक्षय खन्नाचं टेन्शन्स आले आहे.
आता औरंगजेबाच्या कबरीचं ही राजकारण रंगलयं.कबरं येथे का ठेवायची?ती उकडून टाकावी.
औरंगजेब हा आपल्या स्वराज्याचा दुश्मन होता.शंभू राजांना त्यांनी हालहाल करून मारलं.
त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का ठेवायची? आजही काही लोक तिथे नमाज पठणाला जातात चादर चढवतात.औरंगजेबचं,उदात्तीकरण करणारे लोक आता,असूच कसे काय शकतात? हे प्रश्न काही वावगे नाहीत. आपला
इतिहास आता ख-या खोटयाच्या तावडीत सापडलेला आहे. आता काय करायचं?
हे असचं चालू राहिलं तर?
अक्षय खन्नाचं काय होईल याची मला चिंता वाटते.
त्याला सारेच क्रूर औरंगजेब समजात.
त्याच्या जीवावर ही भूमिका बेतू नाही.
दुसरं काय?
रिश्ते वही सोचं नई...!!
जमाना ही दिलवालों का है|
दिमाग का कोई काम नही.
परशुराम सोंडगे बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा