पोस्ट्स

एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथा

इमेज
एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथा Callgirl'sDairy marathi story भाग आठवा गाडीनं वेग घेतला होता.पाऊस जोरात चालू होता. त्याने मॅडमचे दोन्ही ही हात धरले होते.काचा बदं होत्या.ओरडून ही काही उपयोग होणार नव्‍हता.कॉलनीत क्वचितच गाडया येत जात होत्या.अश्या उच्चभ्रू कॉलनीच्या रस्त्याला मुळातचं कित्तीकशी  रहादारी असणार? ज्या पध्दतीने तो मॅडमला ट्रीट करत होता त्यावरून त्याचा इरादा काही चांगला नव्हता.तो फारच वासना व्याकूळ झाला होता.मुळात त्यांच्या गाडीत बसणचं चूक होतं.दोन पुरूष असतानी आपण कसं त्या गाडीत बसावं?मॅडमचा कॉन्फीडन्स त्यांना नडला की काय?अशी  भीती मॅडमलाचं वाटतं होती.                       चौधरी ही मागे दिसत नव्हता.त्यांना लोकेशनं ही कळणार नव्हतं कारण मोबाईल त्यानं फेकून दिला होता.मॅडमच्या अंगाला धरधरून घाम फुटला होता.त्यांच पडलेला पदर ही त्यांना सावरता येत नव्‍हता.त्यांनी दोन्ही हात त्यांचे गच्च पकडले होते. “प्लीज,गाडी थांबवा.मला कुठे नेत आहात.माझा मोबाईल.?” राधा मॅडम कळकळून बोलत होत्या.तो मॅडम...

राधा आणि भागवत पुराण: अप्रत्यक्ष उल्लेखाचे गूढ

इमेज
राधा आणि भागवत पुराण: अप्रत्यक्ष उल्लेखाचे गूढ राधा कृष्ण हिंदू धर्मात महत्वाची देवी देवता आहेत.राधा व कृष्ण यांच प्रेम अतुट होतं.तसं मानलं जात. अनेक ठिकाणी राधाकृष्णाची मंदिरे आहेत  अनेक उत्सव ही राधा व कृष्ण या नावाने साजरे करतात  राधा तत्व हे फार महत्वाचं तत्व आहे असं मानलं जातं. कृष्णाच्या सदैव ह्रदयात वास असलेली कोण असेल तर ती आहे राधा? श्रीकृष्ण चरित्र हे राधेशिवाय पूर्ण कसे होऊ शकत? आपण चरित्र म्हणतो पण राधेशिवाय कृष्णचं कसा असू शकतो? असे भक्त म्हणतात.मानतात.  इतक सारं असताना ही श्रीकृष्ण चरित्राचा महत्वाचा पौराणिक संदर्भ असलेल्या भागवत ग्रंथात मात्र राधेचा उल्लेख नाही. का? श्रीमद् भागवत पुराणात राधेचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही तरीही तिच्या अस्तित्वाची साक्ष पुराणकार साकल्याने देतात.भागवताच्या दशम स्कंधात (१०.३०.२८) गोपिकांच्या मुखातून एक ओळ निघते:  “ अनयाराधितो नूनं भगवान् हरिरीश्वरः”  “ निश्चितच या एका गोपीने भगवान श्रीहरींची पूर्ण आराधना केली आहे, म्हणून ते इतर सर्व सोडून तिच्याकडे एकांतात गेले.”  वैष्णव आचार्य विश्वनाथ चक्रवर्ती, जीव गोस्व...

मोदी-मेलोनी भेट आणि सोशल मीडियाची असभ्यता: वय-लिंगाची टिंगल कधी थांबेल?

इमेज
इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून रंगलेली चर्चा: असभ्यता की राजकीय संस्कृतीचा अपमान? सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात एका राजकीय भेटीचे फोटो, व्हिडिओ आणि छोटे-छोटे क्षण इतके व्हायरल होतात की, त्यामागील खरी राजनैतिक, आर्थिक आणि कूटनीतिक महत्त्वाकांक्षा पार दिसेनाशी होते. नुकत्याच रोममध्ये झालेल्या नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीचेही तेच झाले. चॉकलेट (मेलोडी टॉफी) भेट देणे, सेल्फी काढणे, एकत्र झाड लावणे, स्माइल्स आणि वार्म व्हिडिओ — हे सर्व क्षण इतके हायलाइट झाले की, दोन देशांच्या प्रमुखांमधील रणनीतिक भागीदारी, व्यापार लक्ष्ये, संरक्षण सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवरची चर्चा पार दुर्लक्षित झाली. यावरून जी चर्चा रंगली, ती दुर्दैवाने दोघांच्या लिंग, वय आणि व्यक्तिगत रसायनावर केंद्रित झाली. हे आपल्या सार्वजनिक संवादाची खोलवर असभ्यता दर्शवते का? हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. मोदी मेलोनी सेल्फी प्रथम, मूलभूत गोष्ट स्पष्ट करूया. ही भेट दोन राष्ट्रप्रमुखांची होती. एक स्त्री (इटलीची पंतप्रधान) आणि एक पुरुष (भारताचे पंतप्रधान...

मोटेगावकर प्रकरण : पेपरफुटीमागचं खरं वास्तव काय?

इमेज
मोटेगावकर प्रकरण : पेपरफुटी मागचं खरं वास्तव काय? NEET 2026 Leake पैसा वाईट असतो.हाव फार करू नये.असा सुविचार नेहमी सांगितला जातो.तसे सारेचं सुविचार व्यवहार्य नसतातच. फक्त सांगणे व ऐकणे एवढाच त्यांचा वापर असतो. आपण लोभी म्हातारीची बोधगोष्ट लहानपणा पासूनच ऐकत असतो.सांगत असतो.कुणी वागतं का तसं? कुणीचं नाही.  हल्लीचे स्वंयघोषित संत,मंहत व बुवा भौतिक सुखात पेंगत असतात.ते चिरंतन आनंद,त्याग, मोक्ष व निष्काम कर्मयोग वगैरेवर तोंडाला फेस येईस्तोवर बडबडत असतात.बडबडे किती बडबडले तरी कुणाला घंटा फरक पडत नाही. तेच माया जमा करित बसलेले असतात. संसारात गुरफटत जातात. त्यांच कोण ऐकतयं?  मोटेगावकरांना काय कमी होतं? गड्याचे विचार काय कमी ग्रेट नव्हते? हाव व अहंकाराने त्याच्या सा-या साम्राज्याची माती केली.सावाचे मुखडे घेऊन सारेच फिरतात. एक दिवस येतो बुरखा फाटतो. सत्य तर नागडचं असतं. अंगड टोपडं आपण घालत असतो त्याला.  मोटेगावकर ही केवळ एक व्यक्ती नाही, एक प्रवृत्ती आहे. एक मानसिकता आहे. एक सामाजिक रोग आहे जो आजच्या स्पर्धात्मक, भौतिकवादी युगात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रात पसरला आहे....

“वारकरी संप्रदाय वैदिक आहे का? इतिहास, तत्त्वज्ञान आणि वास्तव”

इमेज
वारकरी संप्रदाय वैदिक आहे का? इतिहास, तत्त्वज्ञान आणि वास्तव” ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर वेदांचा तो अर्थ आम्हासी च ठावा। येरांनी वाहावा भार माथा॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाही। भार धन वाही मजुरीचे॥२॥ उत्पत्तिपाळणसंहाराचे निज। जेणे नेले बीज त्याचे हाती॥३॥ तुका म्हणे आले आपण चि फळ। हातोहाती मूळ सापडले॥४॥ हिंदू समाजात गेल्या हजारो वर्षांपासून दोन विचारप्रवाहांचा सतत संघर्ष चाललेला आहे. त्यातील एक विचारसरणी वैदिक आहे तर दुसरी विचारसरणी समतावादी आहे. वैदिक धर्मविचार सतत वर्णाश्रमाचा, यज्ञादी हिंसक कर्मकांडाचा, जातिविषमतेचा आणि वेदप्रामाण्याचा पुरस्कार करत आला आहे. या वैदिक धर्माला विरोध करत जैन - बौद्धादी श्रमणधर्मांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांचा कैवार घेतला. पुढच्या काळात वारकरी संप्रदाय हा प्रचलित वैदिक धर्माविरुद्ध बंड करत उभा राहिला. वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेची बाजू लावून धरली. मुळात या संप्रदायाची उभारणीच स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र प्रवर्गातून आलेल्या संतांनी केलेली होती. साहजिकच वैदिक वर्णाश्रम धर्म आणि वारकरी संतांचा मूल्यविचार यात मूलभूत फरक आह...

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नावर मोठा खर्च? सोशल मीडियात चर्चेला उधाण”

इमेज
माणसानं गरीब नसावं.अतिशय गरीब तर कुणीच नसावं.वै-यानं पण गरीब नसावं.  श्रीमंत  असावं.फार फार श्रीमंत  असावं.आपण जगात सर्वात श्रीमंत  असावं असं प्रत्येक माणसाला वाटतं असतं.ते एक स्वप्नच असतं.सुप्त असतं पण ते सां-याचं असतं.माणसानं पैशा कमवला पाहिजे कारण कोण म्हणतंय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते? पृथ्वी तर पैशाभोवती फिरते. पैसा कमवा.प्रचंड  पैसा कमवा.कसा ही कमवा पैशाला महत्व आहे. सर्व माणसं श्रीमंत  होत नाहीत.जगातील दारिद्र्य  ही कुणी दूर करू शकत नाही.तुम्हाला हे मान्य का? श्रीमंत  लोक हे देवाचे लाडके असतात.श्रीमंती हे वरदान असते.श्रीमंत लोक ज्ञानी आणि हुशार असतात.गरिब  लोक हे मंद बुध्दी व मूर्ख असतात.गरीबी ही शाप असते. त्यामुळे तुम्ही श्रीमंत  व्हा.     मुक्ती, मोक्ष, चिरंतन  आनंद वगैरे या गोष्टी ख-या नाहीत. पैसा आला की सर्वत्र आनंदी आनंद असतो. आशा, लोभ हे दुःखाचं मूळ नाही.पैसा नसणं हे खरं तुमच्या दुःखाचं कारण आहे. षडविकारावर मात करणं हे शक्य नसतं.ऐश्वर्य आहेत तर ते भोगलं पाहिजे.दाखवलं पाहिजे.ऐश्वर्य  दाखवण्यात पराकोटीचा आनं...

संजय गायकवाड: लोकशाहीचा 'चांगभलं' की सत्तेचा उन्माद? राजकीय प्रवृत्तीचा सडेतोड वेध

इमेज
  ​ संजय गायकवाड: लोकशाहीचा 'चांगभलं' की सत्तेचा उन्माद? राजकीय प्रवृत्तीचा सडेतोड वेध Sanjay Gaikwad News  ​ प्रस्तावना: महाराष्ट्राचे राजकारण हे नेहमीच सुसंस्कृत आणि वैचारिक मतभेदांचा आदर करणारे राहिले आहे. परंतु, अलीकडच्या काळात ही परंपरा पुसली जात असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच केलेले विधान आणि त्यानंतर मागितलेली माफी, हे केवळ एक राजकीय नाट्य नसून ती एका विशिष्ट 'प्रवृत्ती'ची नांदी आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक तर आहेच, पण ती महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला लागलेली कीड आहे.Sanjay Gaikwad Controvers ​ १. माफी की सत्तेचा अहंकार? ​जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी माफी मागतो, तेव्हा त्यात नम्रता आणि पश्चात्ताप अपेक्षित असतो. मात्र, गायकवाड यांनी मागितलेल्या माफीतही एक प्रकारचा 'माज' आणि 'खाज' स्पष्टपणे जाणवत होती. त्यांच्या शब्दांतून व्यक्त झालेली ती 'गाज' हे सिद्ध करते की, ही माफी मनापासून आलेली नसून केवळ प्रकरण अंगाशी येतेय हे पाहून केलेली एक 'राजकीय सोय' आहे. सत्तेची गुर्मी जेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापड...