थांबा , युध्द सुरू आहे..!!
Eran war and India जगात युध्द सुरू आहे.त्याचे परिणाम जगासोबत आपल्याला भोगावे लागणार कारण आपण याच जगात राहतो. गॅस,पेट्रोल व डिझेलचा तुटवडा होणारच आहे. सरकार नीट सांगत नाही.जनतेला विश्वास द्यावा लागतो हे हल्लीच्या सरकारांना माहित नाही.गॅस तुटवडा दाखवून काळा बाजार ही सुरू झाला आहे.साठेबाजी वाढवू लागली. छूपेपणे दर ही वाढले आहेत.सरकार धीर ही देत नाही आणि देत माहिती नाही.अज्ञान भयंकर अश्या भयाला जन्म देते. भारतीय नागरिकांना भयभीत करण्याचे प्रयत्न ही सुरू आहेत. देशातली जनता घाबरली नाही पाहिजे.या युध्दामुळे होणा--या परिणामाची जाणिव लोकाना द्यायला हवी. त्यासाठी जनतेला व प्रशासनाला सजग करणे आवश्यक आहे अमेरिका आणि इराणला सोशल मिडीयावर सल्ले देणे नक्कीच महत्वाचं नाही.अनेक अंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ञ माध्यमावर ज्ञान पाजळत आहेत. सरकार तर वादळात सापडलेल्या शहामृग डोळे बंद करून बसले आहे. आपण डोळे बंद केले की,आपल्या अंगावर वादळ येणार नाही अश्या मूर्ख शहामृगासारखे केंद्र सरकार वागते आहे. राज्य सरकारे आपल्या नेत्याच्या टिमकी व...