पोस्ट्स

एका काॅलगर्लची डायरी-भाग 6

इमेज
                                                                                   भाग सहावा “तुम्हाला काही बोलयचं का?”धिप्पाड देहाच्या त्या टक्कल्या माणसाजवळ जाऊन राधा मॅडम बोलल्या. ते पण त्याच्या डोळयात पहात.तो अजून ही त्यांच्याकडे ‘ऑ’ वासून पहात होता.तो मॅडमकडे आणि मॅडम त्याच्याकडे पहात होत्या आणि गर्दी दोघांकडे पहात होती.तो टक्कला असला तरी श्रीमंत माणूस असावा.स्टार्च केलेले कडक इस्त्रीचं शर्टं.ब्रँन्डेड जीन्स्.हातात सोन्याच्या अंगठया होत्या.गळयात सोन्याची जाड साखळी.श्रीमंतीचा एक माज असतो तो पण चेह-यावर आतोनात होता. “नाही.नाही..!!मला कुठं काय बोलायचं?कोण आहात आपण?”त्याला हा अनपेक्षित धक्का होता.त्याच्या नजरेत एक तुच्छता होती.ती इतकी होती की तो थुंकला नाही हे काय कमी नव्हतं.सहज तिच्याकडं पाहिलं आणि ही डायरेक्ट असं विचारते.तो अधिकच गांगरला. त्याला हे माहित नव्हतं की,तो एका पोलीस ...

मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे रिव्ह्यू २०२५: राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयासह आईच्या अटल लढ्याची खरी कहाणी

इमेज
 मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे रिव्ह्यू २०२५: राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयासह आईच्या अटल लढ्याची खरी कहाणी परिचय: एक आईचा लढा जो संपूर्ण जगाला हेलावून टाकतो २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नाही, तर एका आईच्या अथक संघर्षाची, सांस्कृतिक भेदांची आणि परदेशातील बालकल्याण व्यवस्थेच्या जटिलतेची कथा आहे. राणी मुखर्जीने साकारलेली देबिका चटर्जी ही भूमिका इतकी प्रभावी आहे की चित्रपट पाहताना आपण स्वतःला त्या व्याकुळ आईच्या जागी अनुभवतो. हा चित्रपट सागरिका चक्रवर्ती या खऱ्या महिलेच्या जीवनावर आधारित आहे, जिच्या मुलांना नॉर्वेच्या बालसेवा विभागाने (बार्नेवर्नेट) हस्तगत केले होते. जर तुम्ही आई-मुलांच्या नात्यावर आधारित भावनिक चित्रपट शोधत असाल, परदेशातील भारतीयांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील किंवा राणी मुखर्जीच्या कमबॅकच्या भूमिकेची चर्चा करत असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. चला, या चित्रपटाची सविस्तर समीक्षा, खरी कहाणी, अभिनय, कमतरता आणि सामाजिक संदेश याबद्दल जाणून घेऊया. चित्रपटाची कथा: एका आईचा तीन वर्षांचा लढा कथा साधी पण अत्यंत तीव्र आह...

एका काॅलगर्लची डायरी -भाग 5

इमेज
             भाग पाचवा Call Gril रा खाडी रंगाची सिल्क साडी.त्यावर लेमन कलरचा शॉर्ट ब्‍लाऊज.थोडासा मेकअप करून राधा मॅडम  आरश्या समोर उभा राहिल्या.आपण या कपडयात इतका सुंदर दिसतो की,इतक्या सुंदरच आहोत? त्यांचा त्यांनाच हा प्रश्न पडला.मोकळे सोडलेले केस.त्यांनी एकदा विस्कटून पाहिले.छानसं आरश्यात पाहून हासल्या.स्वत:लाच असं स्माईल देणं त्यांना छान वाटलं.विवेकने जर या साडीमध्ये पाहिलय तर त्याला कस वाटेल? कपडयाचे कलर कॉम्‍बीनेशन्स माणसाचं सौंदर्य खुलवत असेल का? आज त्या स्वत:च्या दिसण्यावर जाम खूश होत्या.आपण सुंदर दिसत असू का सेक्सी की हॉट? विवेकचे नेमके कोणते शब्द असतील आपल्यासाठी आज?अनेक शब्दांचे तरंग मनात उमटत गेले.सेक्सी,हॉटं,मादक,ब्यूटीफूल…!!!                              आपण सेल्फी काढून विवेकला टाकावी का?त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.त्याला थोडेच पैसे पडतात?त्यांनी दोन तीन सेल्फी काढून बघितले...

तरुणाईच्या काळजाचा विषय: सुरेश (आण्णा) धस

इमेज
 तरुणाईच्या काळजाचा विषय: सुरेश (आण्णा) धस तरूणाचं काळिजं : सुरेश धस   आजच्या या डिजिटल आणि डायनॅमिक काळात जिथे प्रत्येक गोष्ट स्क्रोल करताना बदलते,तिथे एक नाव असं आहे जे थांबवतं अनेकांच्या श्वासांना,थेट हृदयात उतरतं, आणि काळजात घर करतं... ते नाव आहे सुरेश अण्णा धस..!!  वयानं मोठे,पण ऊर्जेनं, विचारानं आणि कृतीनं तरुणाईला वेडं लावणारं व्यक्तीमत्व. सुरेश आण्णा धस याच्या कडे तरूण आकर्षिला का जातो? का आहेत तरुणाईच्या गळ्यातील ताईत, सुरेश (आण्णा) धस ?   प्रत्येक तरूणाच्या मनात एक हिरो जोपसलेला असतो. तो हिरो अन्याय विरूध पेटून उठणारा..... दबंग व निडर...... व सत्याची कास धरणारा....अन्यायाची चीड असणारा व  न्यायाची चाड असणारा  असतो.तो निष्कपट पण दमदार असतो.तो प्रचंड अशावादी असतो. माणसाच्या मनातला हिरो कधीच पराभूत होत नसतो.तो लढणारा.. भिडणारा व कुणाला ही नडणारा हिरो असतो. मला वाटत तरुणाई आपल्या मनातील  सुपर हिरो... सुरेश आण्णा धस यांच्यात आपला सुपर हिरो पहात असावा.त्यामुळेच तर आण्णा त्यांच्या गळयातील ताईत आहेत. वयाची सारी बंधन या माणसापाशी गळून पडतात. सुरेश अण्ण...

एका काॅलगर्लची डायरी भाग 4

इमेज
      Callgril's,Dairy                                                                                  पो लिस स्‍टेशनच्या आवारात गाडी शिरताना राधा  मॅडमच्या लक्षात आलं.गर्दी फारच झाली आहे. मिडीयाची एवढी गर्दी ? त्या जरा सावध झाल्या.वर्दीत असलं की सावरायचं म्हणजे नेमकं काय कराचयं? सावरायला व आवरायला वर्दीला थोडाच पदर असतोच?आपल्या केसावर हात फिरवला.शर्ट थोड नीट केलं.अधिकारी असल्यातरी अनेक पुरूषी नजरांना समोर जावं लागतच ना?शेवटी एका स्त्रीच शरीरचं ते.आंबट नजरांना कसं रोखणार?तेवढयात त्यांचा मोबाईल वाजला. "राधा देसाई ना?” समोरून आवाज आला. “ येस.. हो मीच बोलतेय. आपण कोण?” अनोन नंबर होता. “रमेश सांवत सर बोलताहेत आपल्‍याला?”रमेश सांवत विरोधी पक्ष नेता.फार बेरकी माणूस. गावठी. “मॅडम्, हाय का टायेम आमच्यासाठी दोन मिनीटे.” “असं का बोलता? बोला ना?” असचं कुचक काचक बो...

का वाढताहेत अफेअर?

इमेज
 विवाहाच्या योग्य वेळेची शोधार्थ : वयात येण्यापासून लग्नापर्यंतचा वाढता अंतर आणि त्याचे सूक्ष्म परिणाम जीवनाच्या प्रवाहात काही टप्पे असे असतात, जे नैसर्गिक नियमांनी बांधलेले असतात. वयात येणे – ते शारीरिक परिपक्वतेचे पहिले पाऊल – आणि विवाह – जो जीवनाला स्थिरता आणि संतुलन देतो – हे दोन टप्पे एकमेकांशी जवळून जोडलेले आहेत. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ सामाजिक बंधन नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक गरजांची नैसर्गिक पूर्तता मानला गेला आहे. परंतु आधुनिक युगात शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वावलंबनाच्या नावाखाली विवाहाचे वय दिवसेंदिवस पुढे ढकलले जात आहे. जसे बालविवाहाचे दुष्परिणाम समाजाने अनुभवले आहेत, तसेच अनावश्यक उशिरा विवाहही समाजाच्या नैतिक आणि सामाजिक आरोग्याला हानी पोहोचवतो. वयात येण्याचे आणि विवाहाचे बदलते अंतर : एक दृष्टिक्षेप भारतात मुलींच्या वयात येण्याचे सरासरी वय (मेनार्क किंवा पाळी सुरू होणे) सुमारे १२-१३ वर्षे आहे. अनेक अभ्यासांनुसार, स्तन विकास (थेलार्क) १०-११ वर्षांपासून सुरू होतो, तर मुलांमध्ये हे वय ११-१२ वर्षे आहे. म्हणजेच, हार्मोनल बदल आणि शारीरिक आकर्षणाच्य...

एका काॅल गर्लची डायरी -भाग 3

इमेज
                                                        तिसरा भाग झिमझिम पाऊस सुरू होता.राधा मॅडम बाल्‍कनीत उभ्या होत्या.सारं शहरं पावसात चिंब भिजत होतं.पावसाचा पण एक सूर असतो ना? झिमझिम…! रिमझिम…!! थंडगार वारं अंगास झोंबत होतं.तसं त्यांनी अंग चोरलं. एक गोड शहरा अंगभर पसरत गेला.वा-यावर उडणारे केस त्यांनी सावरले.पाचव्या मजल्यावर त्या उभ्या होत्या.पाऊस बरसत असला तरी  रोडवरील गर्दी कमी नव्हती.दुथडी  भरून रस्ते वाहत होते.वेगवेगळया रंगाचे रेन कोटस्, छत्र्या ,वाहनं रंगीत ठिपक्यांची दिसत होते. एक विलक्षण दृश्य दिसतं होतं.माणसंच काय वाहन ही इवल्या इवल्या रंगीत ठिपक्यासारखे दिसत होती.                    पाऊस म्हणजे धरती आणि आकशाचा प्रणयचं ना? धूवाधार पावसाला सोसत राहणारी धरती.हिरवागार शालू परिधन करून पाऊस झेलत,शोषत उतावीळ प्रणयीचं ना? राधा मॅडमला उगीच कुठं तरी वाचलेली ही कवी कल्पना आठवली.बाल्‍कनीतच ...