वैदिक आणि वारकरी
वैदिक आणि वारकरी ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर वेदांचा तो अर्थ आम्हासी च ठावा। येरांनी वाहावा भार माथा॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाही। भार धन वाही मजुरीचे॥२॥ उत्पत्तिपाळणसंहाराचे निज। जेणे नेले बीज त्याचे हाती॥३॥ तुका म्हणे आले आपण चि फळ। हातोहाती मूळ सापडले॥४॥ हिंदू समाजात गेल्या हजारो वर्षांपासून दोन विचारप्रवाहांचा सतत संघर्ष चाललेला आहे. त्यातील एक विचारसरणी वैदिक आहे तर दुसरी विचारसरणी समतावादी आहे. वैदिक धर्मविचार सतत वर्णाश्रमाचा, यज्ञादी हिंसक कर्मकांडाचा, जातिविषमतेचा आणि वेदप्रामाण्याचा पुरस्कार करत आला आहे. या वैदिक धर्माला विरोध करत जैन - बौद्धादी श्रमणधर्मांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांचा कैवार घेतला. पुढच्या काळात वारकरी संप्रदाय हा प्रचलित वैदिक धर्माविरुद्ध बंड करत उभा राहिला. वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेची बाजू लावून धरली. मुळात या संप्रदायाची उभारणीच स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र प्रवर्गातून आलेल्या संतांनी केलेली होती. साहजिकच वैदिक वर्णाश्रम धर्म आणि वारकरी संतांचा मूल्यविचार यात मूलभूत फरक आहे. वैदिक वर्णाश्रम धर्मामुळे हिंदू समाज ...